vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

दिव्यांग व्यक्तींनी विवाह प्रोत्साहन योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

दिव्यांग व्यक्तींनी विवाह प्रोत्साहन योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

सातारा प्रतिनिधी- दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी आणि सामाजिक सुरक्षेसाठी विवाह प्रोत्साहन अनुदान योजनेमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तीने सक्षम (अव्यंग व्यक्तीशी विवाह केल्यास रुपये १ लाख ५० हजार एवढे अर्थसहाय्य मिळणार आहे. तर दिव्यांग व्यक्तीने दिव्यांग व्यक्तीशी विवाह केल्यास रुपये २ लाख ५० हजार एवढे अर्थसहाय्य मिळणार आहे. अर्थसहाय्याची रक्कम पती व पत्नीच्या संयुक्त खात्यात DBT प्रणालीद्वारे हस्तांतरीत होणार आहे.

योजनेच्या अटी व शर्ती पुढील प्रमाणे : जोडप्यातील किमान एक व्यक्ती महाराष्ट्राचा रहिवासी असावी. दिव्यांग व्यक्तीकडे ४० टक्के अथवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्वाचे आधार संलग्न वैध वैश्विक ओळखपत्र असावे. संबंधित व्यक्तींचा हा प्रथम विवाह असावा. घट स्फोटीत असल्यास अशी मदत यापुर्वी घेतलेली नसावी. विवाह हा कायदेशीर रित्या विवाह नोंदणी कार्यालयाकडे नोंदविलेला असावा. विवाह झाल्यानंतर एका वर्षाच्या आत त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे : ४० टक्के अथवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्वाचे आधार संलग्न वैध वैश्विक ओळखपत्र. विवाह नोंदणी दाखला. पती व पत्नीचा आधार संलग्न बँक खात्याचा सविस्तर तपशील. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र. इच्छुक अर्जदारांनी https://divyangsahayakportal.maharashtra.gov.in या दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर अर्ज करावेत. सदर योजनेचा लाभ दि.१८ डिसेंबर २०२५ रोजी व त्यानंतर विवाह झालेल्या व्यक्तींना देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, जिल्हा परिषद, कार्यालयाकडे संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी विद्यानंद चल्लावार यांनी केले आहे.0000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्राची सांस्कृतिक अस्मिता आणि कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या अष्टविनायक देवस्थानांच्या शेकडो एकर जमीनीला धोका पोहोचवणारा- देवस्थान इनाम निर्मूलन कायद्याविरोधात अष्टविनायक मंदिरे एकवटली

सुरक्षित इंटरनेट वापराविषयी जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळा

vishwatmaklokswamivarta

खरीप पीकस्पर्धा जाहीर; अर्जाची मुदत 10 ऑगस्टv अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पतंजली विद्यापीठाचा पदवीदान समारंभ…

vishwatmaklokswamivarta

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड ॲक्शन मोडवर; जलसंधारणाच्या कामांच्या पाहणीसोबतच विविध यंत्रणांचा आढावा *मृद व जलसंधारणाच्या कामांना गती देवून पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त कामे पूर्ण करावीत- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड*▪️ जिल्हास्तरावर सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्याच्या सूचना▪️जिल्हास्तरीय यंत्रणांकडून कामांचा आढावा

महिलांच्या सुरक्षितता व सक्षमीकरणासाठी ‘सखी वन स्टॉप सेंटर’ अधिक सक्षम करण्याचे निर्देश – मंत्री आदिती तटकरे