vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

खरीप पीकस्पर्धा जाहीर; अर्जाची मुदत 10 ऑगस्टv अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

खरीप पीकस्पर्धा जाहीर; अर्जाची मुदत 10 ऑगस्टv अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

लातूर, प्रतिनिधी : राज्यातील अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी आणि प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागामार्फतखरीप हंगाम 2026-27साठी राज्यांतर्गत पीकस्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. यंदापासून प्रथमच अर्ज प्रक्रिया स्वतंत्रऑनलाइन पोर्टलद्वारेराबविण्यात येणार आहे.अर्ज करण्याची अंतिम मुदत10 ऑगस्ट 2026आहे.

शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या http://krishi.maharashtra.gov.inसंकेतस्थळावरील’पीक स्पर्धा नोंदणी’टॅबवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीदिलीप जाधवयांनी केले आहे.

पीकस्पर्धेअंतर्गत भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल या11 खरीप पिकांचासमावेश करण्यात आला आहे. स्पर्धा तालुका, जिल्हा आणि राज्य या तीन स्तरांवर होणार आहे. तालुकास्तरावरील उत्पादकतेच्या आधारे पुढील स्तरासाठी विजेत्यांची निवड केली जाईल.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असणे व ती स्वतः कसत असणे आवश्यक आहे. एका शेतकऱ्याला एकापेक्षा अधिक पिकांसाठी स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. भातासाठी किमान20 गुंठे, तर इतर पिकांसाठी40 गुंठे सलग क्षेत्रअसणे बंधनकारक आहे.अर्जासोबतफार्मर आयडी, प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, आदिवासी गटासाठी जात प्रमाणपत्र, बँक खाते तपशील व पासबुकच्या पहिल्या पानाची प्रतजोडावी लागणार आहे.

सर्वसाधारण गटासाठी प्रवेश शुल्क300 रुपये, तर आदिवासी गटासाठी150 रुपयेनिश्चित करण्यात आले आहे.पीकस्पर्धेतील विजेत्यांना तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. तालुकास्तरावर पहिले5 हजार, दुसरे3 हजारआणि तिसरे2 हजार रुपये; जिल्हास्तरावर पहिले10 हजार, दुसरे7 हजारआणि तिसरे5 हजार रुपये; तर राज्यस्तरावर पहिले50 हजार, दुसरे40 हजारआणि तिसरे30 हजार रुपयेबक्षीस दिले जाणार आहे.याबाबत अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही कृषी विभागाने कळवले आहे.

 

****

संबंधित पोस्ट

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जिल्हाधिकारी कार्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली-कर्तव्यदक्ष, शिस्तबद्ध आणि वक्तशीर नेतृत्व गमावले-जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ

vishwatmaklokswamivarta

महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात सर्वात युवा चेहरा कुमारी स्नेहा कासारे धारावीच्या प्रभाग क्रमांक 186 मध्ये भरणार फॉर्म…

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील ३०३ जणांना समारंभपूर्वक नियुक्तीपत्र प्रदान,सरकारी नोकरी म्हणजे जनतेच्या सेवेची संधी- पालकमंत्री संजय शिरसाट

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यशस्वीपणे राबविण्यासाठी महाराष्ट्रातील अंगणवाड्यांमध्ये दिव्यांग प्रोटोकॉल प्रशिक्षण संपन्न..

५ वर्षांच्या विश्रांतीनंतर कैलास मानसरोवर यात्रेला २० जूनपासून सुरुवात होणार; पहिला ताफा यात्रेकरूंचा उद्या गंगटोकला पोहोचणार

vishwatmaklokswamivarta

पेन्शन अदालत’मधून निवृत्तीवेतनधारकांना मोठा दिलासा-अनेक प्रलंबित प्रश्नांची जागेवरच सोडवणूक