vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राजर्षी शाहू महाराज मानधन योजना ;जेष्ठ साहित्यिक, कलावंतांनी अर्ज दाखल करण्याचे आवाहन

राजर्षी शाहू महाराज मानधन योजना ;जेष्ठ साहित्यिक, कलावंतांनी अर्ज दाखल करण्याचे आवाहन

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी शासनाच्या ‘राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजने’ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.दि.१ जुलै, २०२६ ते ३१ जुलै, २०२६ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याचे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत , जिल्हा परिषद छत्रपती संभाजी नगर यांनी केले आहे.

 १६ मार्च, २०२४ च्या शासन निर्णयानुसार, या योजनेद्वारे पात्र जेष्ठ साहित्यिक व कलाकारांना प्रती महिना ५,००० रुपये मानधन दिले जाते.अर्जदाराचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त असावे (दिव्यांगांसाठी वयोमर्यादा ४० वर्षे आहे). कला किंवा साहित्य क्षेत्रातील किमान १५ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ६०,००० रुपयांपेक्षा जास्त नसावे.अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे.

तसेच, अर्जदार इतर कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेचा लाभार्थी नसावा.इच्छुक आणि पात्र साहित्यिक,कलाकारांनी आपले अर्ज महाराष्ट्र शासनाच्या दिनांक १ जुलै, २०२६ ते ३१ जुलै, २०२६ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

अर्जासोबत वयाचा दाखला, आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला आणि बँक तपशिलासह आवश्यक. अपंगत्व दाखला लागू असल्यास केंद्र किंवा राज्य सरकार पुरस्कार प्रमाणपत्र असल्यास तसेच नामांकित संस्था किंवा व्यक्ती यांच्या शिफारस पत्र व या संबंधित विविध पुरावे याची कागदपत्रे कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

00000

संबंधित पोस्ट

स्वच्छ सर्वेक्षण 2024’मध्ये आता स्वच्छ शहरांच्या नियमित क्रमवारीपेक्षा उच्च स्थानावर ‘सुपर स्वच्छ नवी मुंबई’**10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहरात ‘सुपर स्वच्छ लीग’ मध्ये समाविष्ट महाराष्ट्रातील एकमेव शहर**महामहिम राष्ट्रपती श्रीम.द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते स्विकारला सन्मान**यशाचे श्रेय सातत्य राखणा-या स्वच्छतामित्र, स्वच्छतासखी आणि सर्व नागरिकांचे*

vishwatmaklokswamivarta

भारतीय राज्यघटनेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय परिसंवाद संपन्न

प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्तीपर गितांवर सामुहिक कवायत कार्यक्रम;जिल्ह्यातून सव्वा लाख विद्यार्थी सहभागी होणार

vishwatmaklokswamivarta

*सत्यशोधक समाज वर्धापन दिनानिमित्त जाहीर व्याख्यानाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

नांदेड जिल्ह्यातील ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडल्याने दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांचे अर्थसाहाय्य-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून संवेदना व्यक्त

पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यास ऑपरेशन सिंदूर मोहिमेतून चोख प्रत्युत्तर देणाऱ्या भारतीय सैन्य दलाच्या सन्मानार्थ सातारा जिल्ह्यात जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर तिरंगा रॅलीचे 20 मे रोजी आयोजन