vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

हर घर तिरंगा–हर घर स्वच्छता’ मोहीमांतून नवी मुंबईत स्वच्छतेसह आरोग्यावर भर

‘हर घर तिरंगा–हर घर स्वच्छता’ मोहीमांतून नवी मुंबईत स्वच्छतेसह आरोग्यावर भर

      नवी मुंबई प्रतिनिधी-  ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत केंद्र सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ मोहीमेच्या अनुषंगाने देशातील सुपर स्वच्छ शहरांमध्ये नामांकित असलेल्या नवी मुंबई शहरातही महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने ‘हर घर तिरंगा – हर घर स्वच्छता’ अभियान व्यापक स्वरूपात राबविण्यात येत आहे.

या अंतर्गत विविध भागांतील दुर्लक्षित भागांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यात असून त्यासोबतच सोसायट्या, वसाहती याठिकाणी कच-याचे 4 प्रकारे वर्गीकरण करण्याविषयी नागरिकांना माहिती देऊन त्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे.

          या अंतर्गत घणसोली सेक्टर 30 येथील यशोदीप हाईट्स सोसायटी तसेच सेक्टर 8 येथील गामी रिजन सोसायटी याठिकाणी सोसायटीमधील रहिवाशी तसेच सोसायटीचे स्वच्छताकर्मी यांना कचरा वर्गीकरणाविषयी माहिती देऊन त्याची अंमलबजावणी करण्याचे सांगण्यात आले.

          सेक्टर 6 समर्थनगर घणसोली भागात स्वच्छता मोहीमेप्रमाणेच आरोग्य विभागाच्या वतीने मलेरिया-डेंग्यू प्रतिबंधात्मक मोहीम राबविण्यात आली. यामध्ये स्वच्छताकर्मींनी परिसर स्वच्छ करतानाच पाणी साचलेल्या ठिकाणी डासांची उत्पत्ती होत असल्याने उघड्यावर पडलेले टायर्स व इतर साहित्य जमा करण्यात आले. अशाच प्रकारच्या स्वच्छता मोहीमा करावेगाव, आग्रोळीगाव, दिघा विभागातील व्यावसायिक क्षेत्र, सेक्टर 16 जय भवानी मार्केट ऐरोली, जुहूगाव, महापेगाव याठिकाणी राबविण्यात आल्या.

          ‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियानांतर्गत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने सखोल स्वच्छता मोहीमा तसेच आरोग्य विभागामार्फत मलेरिया, डेंग्यू प्रतिबंधात्मक मोहीमा तसेच मूषक नियंत्रण मोहीमा संयुक्तपणे राबविण्यात येत आहेत. अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.राजेश म्हात्रे व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे यांच्या नियंत्रणाखाली संयुक्तपणे या विशेष सखोल स्वच्छता मोहीमा राबविण्यात येत असून नागरिकांचाही या मोहीमांना चांगला प्रतिसाद लाभत आहे.

         तरी नवी मुंबईकर नागरिकांनी पावसाळी कालावधीत साथरोगांची संभाव्य शक्यता लक्षात घेऊन आपल्या घरात व घराभोवताली पाणी साचून राहिल्यास होणारी डासउत्पत्ती स्थाने होऊ न देण्याची काळजी घ्यावी व तापसदृश्य स्थिती असल्यास तत्परतेने वैद्यकीय सल्ला घ्यावा असे आवाहन महापौर श्रीम. सुजाता पाटील आणि आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

00000

संबंधित पोस्ट

मुंबई पोलिसांचे डीसीपी डॉ. सुधाकर पठारे यांचे हैदराबादमध्ये रस्ते अपघातात निधन…

वडाळा ट्रक टर्मिनल पोलिसांची मोठी कारवाई – दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या ५ गुन्हेगारांना अटक, लाखोंची मालमत्ता जप्त…

कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रासाठी अतिवृष्टीचा इशारा महाराष्ट्रात पुढील आठवडाभर पावसाचा जोर

युआयटीच्या पहिल्या बॅचने आपल्या कामगिरीतून संस्थेची नवी ओळख घडवावी – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा**बी.टेक. विद्यार्थ्यांचा ‘दीक्षा आरंभ’ उत्साहात; तांत्रिक ज्ञानासोबत व्यावहारिक कौशल्य व आत्मविश्वास विकसित करण्याचे आवाहन*दोन महिन्यांच्या इंटर्नशिपमधून विद्यार्थ्यांना मिळणार उद्योगांचा प्रत्यक्ष अनुभव; विविध कंपन्या व उद्योगांमध्ये करिअरच्या व्यापक संधी*राज्यस्तरीय ॲथलेटिक्समध्ये चमकलेल्या मोनिका सानू मडावीचा गौरव; गडचिरोलीत सुसज्ज ॲथलेटिक ट्रॅक उभारणीला शासनाची मंजुरी*

vishwatmaklokswamivarta

शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे धडे* जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्यावतीने जनजागृती * जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

अहिल्यानगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मास्टर प्लॅन राबविण्यावर भर – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील