vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राष्ट्रीय पोषण माह’च्या माध्यमातून महिला व बालकांच्याआरोग्यासंदर्भात जनजागृती- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे‘आठव्या राष्ट्रीय पोषण माह’चे १७ सप्टेंबर रोजी उद्घाटन

राष्ट्रीय पोषण माह’च्या माध्यमातून महिला व बालकांच्याआरोग्यासंदर्भात जनजागृती- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे‘आठव्या राष्ट्रीय पोषण माह’चे १७ सप्टेंबर रोजी उद्घाटन

मुंबई, प्रतिनिधी : महिला व बालकांच्या आरोग्य व पोषणविषयक स्थितीमध्ये सुधारणा आणि जनजागृतीसाठी २०१८ पासून ‘पोषण माह’ अभियान राबविण्यात येते. राज्यातील सर्व अंगणवाडीमध्ये १७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर या कालावधीत ८ वा राष्ट्रीय पोषण महिना साजरा करण्यात येणार असून, या अभियानाचे उद्घाटन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते होणार आहे. या समारंभांचे आयोजन १७ सप्टेंबर रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे दुपारी १.०० वाजता आयोजित करण्यात आले आहे.

आठव्या ‘राष्ट्रीय पोषण माह’साठी यंदा केंद्र शासनाने “लठ्ठपणा कमी करणे, बालपणाची काळजी व शिक्षण (ECCE) / पोषणही शिक्षणही, अर्भक व बालक आहार पद्धती (IYCF), पुरुष सहभाग, व्होकल फॉर लोकल व स्वावलंबन, एकत्रित कृती व डिजिटायझेशन” या सहा प्रमुख थीम निश्चित केल्या आहेत. बाळाचे पहिले सुवर्णमयी १००० दिवस या पुस्तिकेचे प्रकाशन तसेच नवनियुक्त अंगणवाडी सेविका-मदतनीस यांना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते नियुक्तिपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्याकरिता सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ग्रामविकास, नगरविकास, आदिवासी विकास व इतर विभागांच्या समन्वयाने व अभिसरणाच्या माध्यमातून पोषण अभियान कार्यक्रमाची अंमलबजावणी ग्रामीण, आदिवासी व नागरी क्षेत्रातील एकूण ५५३ बाल विकास प्रकल्पातील एक लाख १० हजार ६२९ केंद्रात राबविण्यात येते. एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत ६ महिने ते ३ वर्ष वयोगटातील २५ लाख ८२ हजार ३३० बालके, ३ ते ६ वयोगटातील २४ लाख ७४ हजार ४१७ बालके, ४ लाख ३२ हजार २३४ गरोदर महिला व ४ लाख २३ हजार ७५६ स्तनदा माता या योजनेचा लाभ घेत आहेत.

महाराष्ट्र राज्याने पोषण अभियानांतर्गत मागील सात वर्षांत उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर पहिल्या तीन क्रमांकांमध्ये सातत्याने स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे सन २०२४ मध्ये राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकावला होता. यावर्षी देखील विविध जनजागृती उपक्रम, वेबिनार, दूरदर्शनवरील कार्यक्रम तसेच जन आंदोलन डॅशबोर्डच्या माध्यमातून नागरिकांचा व्यापक सहभाग सुनिश्चित करून पोषणयुक्त महाराष्ट्र आणि सुपोषित भारत घडविण्याचा संकल्प आहे.

0000

 

संबंधित पोस्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आक्षेपार्ह शब्दात टीका केल्याबद्दल भाजपाच्या प्रतिनिधी मंडळानं निवडणूक आयोगाची भेट घेतली. 

खेळाडूंच्या जडणघडणीसाठी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांसह उत्तम पायाभूत सुविधा देण्यावर भर – मुख्यमंत्री देवेंद फडणवीस ७५ व्या राज्य बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

लातूर येथील पत्रकार कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसादसकारात्मक पत्रकारितेमुळे समाजाला योग्य दिशा- पोलीस अधीक्षक अमोल तांबे· विभागीय माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आयोजन· कृत्रिम बुद्धिमत्ता, वृत्त संकलन-संपादनाविषयी मार्गदर्शन

सासपाडे येथील आरोपीला फाशीची शिक्षा होईपर्यंत पाठपुरवा करणार*- पालकमंत्री शंभूराज देसाई*सासपडे येथील दोन्ही पिडीत कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत*

vishwatmaklokswamivarta

मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त पूर्व उपनगरी आयुक्त श्री अविनाश जी ढाकणे साहेब यांची आज त्यांच्या दालनात त सदिच्छा भेट…

vishwatmaklokswamivarta

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त कुर्ला स्टेशन जवळ रियल ज्यूस चे वाटप