vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्य एड्स नियंत्रण कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाबाबत शासन सकारात्मक- आरोग्य राज्यमंत्री मेघना सासाकोरे-बोर्डीकर

राज्य एड्स नियंत्रण कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाबाबत शासन सकारात्मक- आरोग्य राज्यमंत्री मेघना सासाकोरे-बोर्डीकर

मुंबई, प्रतिनिधी : राज्य एड्स नियंत्रण संस्थेअंतर्गत कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवांचे समायोजन करण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.

निर्मल भवन येथे राज्य एड्स नियंत्रण कर्मचारी सेवा समायोजन कृती समितीच्या प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस एड्स नियंत्रण संस्थेचे वरिष्ठ अधिकारी तसेच कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यभर एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत १,६०० कर्मचारी कंत्राटी तत्वावर कार्यरत आहेत. यातील बहुतांश कर्मचारी २५ ते ४० वयोगटातील असून त्यांना या क्षेत्रातील अनुभव आहे. भविष्यात एड्स नियंत्रण कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी अनुभवी मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेता, या कर्मचाऱ्यांच्या सेवांचे समायोजन करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील, असेही आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी यावेळी सांगितले.

००००

संबंधित पोस्ट

नवीन पिढीपुढे एक आदर्श-अल रेहान -उद्योजक जगतातील प्रेरणादायी व्यक्तीमत्व शहबाज भाई

जिल्हा परिषद ठाणे येथे ‘सेवा हक्क दिन’ निमित्त शपथविधी कार्यक्रम उत्साहात“आपली सेवा, आमचे कर्तव्य” संकल्पाने पारदर्शक व वेळेत सेवा देण्याचा निर्धार

फळ महोत्सवास भरभरून प्रतिसाद देऊन शेतकऱ्यांच्या मेहनतीला पाठबळ द्यावे- जिल्हाधिकारी अशोक काकडे- तीनदिवसीय फळ महोत्सवाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

अण्णासाहेब पाटील महामंडळाकडील योजनांचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडून आढावा

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांना श्रद्धांजली चतुरस्त्र अभिनेता, कला क्षेत्रातील मार्गदर्शक दुवा

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर तसेच दि. ६ व ७ जुलै रोजी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केल्याने जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, नदी-नाले, धबधबे व पूरग्रस्त भागांपासून दूर राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले आहे.