vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पी. एम. किसान योजनेच्या लाभासाठी ई-केवायसी त्वरीत करावी

पी. एम. किसान योजनेच्या लाभासाठी ई-केवायसी त्वरीत करावी

सातारा प्रतिनिधी : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाने वार्षिक ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करणे बंधनकारक केले आहे. चालू वर्ष २०२५-२६ साठीची ही ई-केवायसी मोहीम पूर्ण करण्यासाठी ३० जून २०२६ ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नाही अशांनी त्वरीत ई-केवायसी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे

लाभार्थी शेतकऱ्यांना बायोमॅट्रिक आणि फेस ऑथेंटिकेशन या दोन पद्धतींनी प्रमाणीकरण पूर्ण करता येईल. बायोमॅट्रिक प्रमाणीकरणाद्वारे ई-केवायसी करण्यासाठी शेतकरी नजीकच्या सामायिक सुविधा केंद्र (CSC Center) वर जाऊ शकतील, तसेच शेतकरी स्वतःच्या मोबाईलवर ‘पीएम-किसान’ मोबाईल अॅप डाऊनलोड करून स्वतःच्या चेहऱ्याव्दारे ई-केवायसी पूर्ण करू शकतील.

वृद्ध, आजारी किंवा दिव्यांग लाभार्थ्यांना हालचाली संबंधी अडचणी आहेत आणि केंद्रावर जाणे शक्य नाही, त्यांच्यासाठी प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे. गाव पातळीवरील ग्रामस्तरीय नोडल अधिकारी व क्षेत्रीय कर्मचारी अशा शेतकऱ्यांकडे वैयक्तिकरीत्या लक्ष देऊन फेस ऑथेंटिकेशनद्वारे त्यांची ई-केवायसी पूर्ण करण्यास मदत करतील. जिल्हयातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी ३० जून २०२६ पूर्वी ई-केवायसी पूर्ण करावी, असे आवाहनही जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्रीमती. फरांदे यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

अमरावती आयटीआयमध्ये सोमवारी शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

विजाभज आश्रमशाळा कर्मचाऱ्यांची प्रकरणे निकाली काढावीआमदार सुधाकर अडबाले यांनी घेतली विजाभज आश्रमशाळेची सहविचार सभा..

vishwatmaklokswamivarta

पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातही पाचपर्यंत बंपर मतदान; सीएम ममतांचा गंभीर आरोप, म्हणाल्या, ‘CRPF ने सर्व मतदान केंद्रे बळकावले…

गडचिरोली येथील क्रांतीवीर बाबुराव शेडमाके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (#आयटीआय) येथे राबविण्यात आलेल्या ‘ट्रॅक्टर सर्विस मेकॅनिक’ या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमातून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या २५ विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप

समता आणि बंधुत्वाचा संदेश देणारे संत रविदास महाराजांचे स्मारक ठरणार समाजासाठी प्रेरणास्थान: खासदार कल्याण काळे-जगतगुरु संत शिरोमणी रविदास महाराज स्मारक समितीतर्फे भव्य स्मारकासाठी साकडे; सामाजिक समरसता आणि एकतेचा जागर करण्याचा खासदारांचा निर्धार

सावित्री जत्रा’ महिलांना स्वावलंबी करणारी चळवळ-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिनी सरस सावित्री जत्रा’ जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन