
*माजी सैनिकांच्या मुलांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्याचे आवाहन*
सातारा प्रतिनिधी माजी सैनिक, माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांचेमार्फत प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजने अंतर्गत माजी सैनिक, माजी सैनिक विधवांच्या मुलींसाठी रक्कम ३६ हजार व मुलांसाठी ३० हजार शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. ज्या पाल्यांनी १२ वी परीक्षेत व पदवी परीक्षेत किमान ६० टक्के गुण मिळवले आहेत व त्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे अशा सर्व पाल्यांसाठी ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. तरी माजी सैनिकांच्या पाल्यांनी www.ksb.gov.in या संकेतस्थळावर अर्ज ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत भरावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाकडून कण्यात आले आहे.
0000



