vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना शहर महानगरपालिका विषय समित्यांचे भाजपा उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल

जालना शहर महानगरपालिका विषय समित्यांचे भाजपा उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल

जालना, (प्रतिनिधी) : जालना शहर महानगरपालिकेच्या विषय समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम पीठासन अधिकारी श्री.मिसाळ साहेब यांनी दि.११.०३.२०२६ रोजी जाहीर केला त्यानुसार दि.१२.०३.२०२६ रोजी फॉर्म विक्री करण्यात आली व आज दि.१३.०३.२०२६ रोजी सर्व विषय समित्यांचे सभापती व उपसभापती पदाचे नामनिर्देशन आज दुपारी ३.०० वाजेपर्यंत दाखल करणे, भारतीय जनता पार्टी च्या वतीने महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी अशोक उर्फ लक्ष्मीकांत मनोहर पांगारकर यांचा तसेच महिला व बालकल्याण सभापती पदाकरिता सौ.संध्या संजय देठे, उपसभापती पदाकरिता सौ.पद्मा अजित मानधनी, स्वच्छता व आरोग्य समिती समितीवर सभापती पदासाठी श्री. कपिल श्रावण भूरेवाल व उपसभापती पदासाठी सौ.अनामिका विजय पांगारकर, बांधकाम समिती सभापती पदाकरिता सौ.माया मनोज जोशी व उपसभापती पदाकरिता सौ.ऐश्वर्या अशोक आडेकर शिक्षण व विद्युत सभापती पदासाठी सौ. भाग्यश्री सुजितकुमार जोगस व उपसभापती पदासाठी सौ. कार्तिकी मनोज इंगळे, पाणीपुरवठा व जलनिस्सारण सभापती पदाकरिता सौ. पूनम राजेश स्वामी व उपसभापती पदासाठी सौ. अनिता मोहन खोडवे यांचे नामनिर्देशन दाखल करण्यात आले. दि.१७.०३.२०२६ रोजी सदरील नामनिर्देशन पात्रांची छाननी होऊन विजय झालेल्या सर्व उमेदवारांची घोषणा होणार आहे.

सदरील नामनिर्देशन पत्र दाखल करते वेळी महापौर श्रीमती वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, भाजपा सभागृह गटनेते महेश निकम, नगरसेवक सिद्धिविनायक मुळे, देविदास देशमुख, राजेश जोशी, सुजित जोगस, शिवराज जाधव, शिवाजी वेताळ, रणजीत मगरे, राजेश बाबरेकर, विजय पांगारकर, धिरज मेवाडे, बापू साळवे, अशोक आडेकर, मनोज इंगळे, लक्ष्मण गोर्डे, प्रतिक पांगारकर, मनोज जोशी, अमित मानधनी, रवि सले, नारायण पवार इत्यादीसह सर्व उमेदवार व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.बाबासाहेब पाटील

 

संबंधित पोस्ट

३८ वर्षांनंतर कृषी विभागाला मिळाले नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्य नव्या बोधचिन्ह आणि घोषवाक्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण,”हा लोगो म्हणजे नव्या युगातील नव्या कृषी विचारांचा आरंभ आहे.” – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

vishwatmaklokswamivarta

फळपिक विमा योजनेच्या लाभाबाबत आवाहन

कारगिल विजय दिवस 26 जुलै रोजी पालकमंत्री यांच्या उपस्थितीत होणार साजारा

vishwatmaklokswamivarta

कबुतरांचे जीव वाचविणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे, या तिनही बाबी महत्त्वाच्या आहेत. कबूतरखाना अचानक बंद करणे योग्य नाही,पर्यायी उपाययोजना करण्यात याव्यात. कबूतरखाना परिसरात कबुतरांच्या खाद्यपुरवठ्यावर निर्बंध आल्याने उपासमारीची वेळ त्यांच्यावर ओढवू नये, यासाठी पर्यायी व्यवस्था पूर्ण होईपर्यंत महानगरपालिकेने कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत आपल्या संवेदनशील मनाची पुन्हा एकदा ओळख देत कबुतरांचे प्राण वाचवून नागरिकांचे आरोग्य सांभाळण्यासाठी पुढाकार घेतला.

vishwatmaklokswamivarta

कोल्हापूर विभागाला १२० नवीन बस मिळणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक कोल्हापूर जिल्ह्यातील चार सुसज्ज बसस्थानकांचे लोकार्पण

वातावरणीय कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करावी- जिल्हाधिकारी अशोक काकडे- समित्यांच्या आढावा बैठकीत दिली माहिती

vishwatmaklokswamivarta