vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पथविक्रेत्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बुलढाण्यात विशेष लोककल्याण मेळावा

पथविक्रेत्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बुलढाण्यात विशेष लोककल्याण मेळावा

बुलढाणा,द प्रतिनिधी: नगर परिषद बुलढाणा अंतर्गत पीएम स्वनिधी (PM SVANidhi) योजनेला सहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शहरातील पथविक्रेत्यांसाठी विशेष लोककल्याण मेळावा व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात नवीन लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारण्यात येत असून योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे

शहरातील फेरीवाले, भाजीपाला विक्रेते, फळविक्रेते, फास्ट फूड विक्रेते तसेच इतर लघु व्यावसायिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात १५ हजार रुपये, दुसऱ्या टप्प्यात २५ हजार रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात ५० हजार रुपये पर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते

नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना ७ टक्के व्याज अनुदानाचा लाभ मिळणार असून विविध पूरक योजनांचाही लाभ दिला जाणार आहे. तसेच कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना बँकांमार्फत क्रेडिट कार्ड सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली

हा कार्यक्रम नगर परिषद बुलढाणाच्या नगराध्यक्षा पूजाताई गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे. शहरातील सर्व पात्र पथविक्रेत्यांनी या संधीचा लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी नगर परिषद बुलढाणा येथील DAY-NULM केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन नगर परिषद बुलढाणाचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

१२ हजार दुध उत्पादकांच्या खात्यात १५ कोटी रुपयांचे अनुदान थेट जमा

vishwatmaklokswamivarta

सावंतवाडीत ‘सेवा संकल्प अभियाना’चा शुभारंभ आरोग्य जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी व निरोगी जीवनशैलीच्या प्रसारावर भर

vishwatmaklokswamivarta

माणगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा योगाभ्यास सर्वदूर पोहोचविणे आवश्यक– महिला व बालविकास मंत्री कु.अदिती तटकरे

लडाखमध्ये भूकंपाचा धक्का! लेह परिसरात रिश्टर स्केलवर ५.५ तीव्रतेची नोंद..

विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.एकनाथ शिंदे व श्रीमती लता एकनाथ शिंदे यांचे Enumeration Form आज भरून घेण्यात आले.

अधिकाऱ्यांनी लोकमान्यता मिळेल असे प्रशासकीय कार्य करावे – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील