
राज्यातून बातमी जालन्यातल्या ऊसतोड मजुराच्या दोन मुली आणि एका मुलाची मुंबई पोलीस दलात निवड.
राज्य प्रतिनिधी-जालन्यातल्या ऊसतोड मजुराच्या दोन मुली आणि एका मुलाची मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे रघुनाथ, यशोदा आणि राधा राठोड या तिन्ही भावंडांनी जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर खाकी वर्दीचे स्वप्न साकार केले.
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील लोणार भायगाव येथील राठोड कुटुंबाने संघर्षावर मात करत इतिहास घडवला आहे. ऊसतोड मजूर आई-वडिलांच्या तीन सख्या मुलांची मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे. रघुनाथ, यशोदा आणि राधा राठोड या तिन्ही भावंडांनी जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर खाकी वर्दीचे स्वप्न साकार केले.



