vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी अर्ज करावेत 

अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी अर्ज करावेत

जालना, प्रतिनिधी:- जिल्ह्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजना ग्रामीण प्रकल्पाअंतर्गत अंगणवाडी सेविकास व मदतनीस यांची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. एकात्मिक बाल विकास सेवा योजना तालुका प्रकल्पनिहाय पद भरती करण्यात येत आहे. तरी संबंधित महिलांनी अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी कोमल कोरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

जालना-1 प्रकल्पात अंगणवाडी सेविका 5 व मदतनीस 25 पदे भरण्यात येणार आहेत. अंबड-1 प्रकल्पात अंगणवाडी सेविका 18 व मदतनीस 44 पदे भरण्यात येणार आहेत. अंबड-2 प्रकल्पात अंगणवाडी सेविका 9 व मदतनीस 17 पदे भरण्यात येणार आहेत. घनसावंगी-1 प्रकल्पात अंगणवाडी सेविका 13 व मदतनीस 33 पदे भरण्यात येणार आहेत. घनसावंगी-1 प्रकल्पात अंगणवाडी सेविका 18 व मदतनीस 39 पदे भरण्यात येणार आहेत. भोकरदन-1 प्रकल्पात अंगणवाडी सेविका 4 व मदतनीस 14 पदे भरण्यात येणार आहेत. भोकरदन-2 प्रकल्पात अंगणवाडी सेविका 3 व मदतनीस 20 पदे भरण्यात येणार आहेत. जाफ्राबाद प्रकल्पात अंगणवाडी सेविका 12 व मदतनीस 26 पदे भरण्यात येणार असून या सर्व प्रकल्पात अर्ज स्विकारण्याचा दि.24 फेब्रुवारी 2025 पर्यंत आहे. तसेच परतूर प्रकल्पात अंगणवाडी सेविका 9 व मदतनीस 16 पदे आणि मंठा प्रकल्पात अंगणवाडी सेविका 5 व मदतनीस 29 पदे भरण्यात येणार असून या दोन प्रकल्पात अर्ज स्विकारण्याचा दि.28 फेब्रुवारी 2025 पर्यंत आहे. जालना-2 प्रकल्पात अंगणवाडी सेविका 12 व मदतनीस 35 पदे भरण्यात येणार असून अर्ज स्विकारण्याचा दि.21 फेब्रुवारी 2025 पर्यंत आहे. बदनापूर प्रकल्पात अंगणवाडी सेविका 6 व मदतनीस 44 पदे भरण्यात येणार असून अर्ज स्विकारण्याचा दि.25 फेब्रुवारी 2025 पर्यंत आहे. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे*महाराजस्व अभियानातून नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक*खारतळेगाव येथील पाणंद रस्त्याची पाहणी*जनता दरबारात नागरिकांची ८५ निवेदने स्विकारली.

पलूस नवोदय विद्यालयात प्रवेश अर्जासाठी 29 जुलैची मुदत..

vishwatmaklokswamivarta

ग्रामीण प्रगतीसाठी बँकांची भूमिका महत्त्वाची – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा**बँक ऑफ इंडिया, आष्टी शाखेचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन*

vishwatmaklokswamivarta

प्रचाररथांच्या माध्यमातून ‘तलावांचे पुनरुज्जीवन’ कामांना वेगशासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व गावांनी पुढे यावे

बाबूरावजींनी अनेकांना प्रेरणा दिली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस