vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख अलिबाग येथे भूमि अदालतचे आयोजन

जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख अलिबाग येथे भूमि अदालतचे आयोजन

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी:- महसूल मंत्री महोदयांच्या निर्देशानुसार प्रलंबित अपिल प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करण्याकामी दि.29 सप्टेंबर, दि.30 सप्टेंबर, दि.06 ऑक्टोबर व 07 ऑक्टोबर 2025 रोजी भूमि अदालत सकाळी 11.00 व दुपारी 3.00 वाजता या दोन सत्रात जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख रायगड-अलिबाग यांचे कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवारात, हिराकोट तळावाजवळ, अलिबाग येथे आयोजित करण्यात आली आहे, असे जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख रायगड-अलिबाग सुनिल इंदलकर यांनी कळविले आहे.

या तारखांमध्ये सुनावणीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. सदर अपील प्रकरणांमध्ये अपिलार्थी यांनी उत्तरार्थी यांना सुनावणीच्या नोटीसा बजावण्याच्या आहेत व त्याची पोहोच सुनावणीवेळी सादर करावयाची आहे.

तसेच या तारखांना जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख रायगड कार्यालयाकडून फेरचौकशीकामी पाठविण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये व तक्रार अर्जावरील प्रकरणांमध्ये तालुका स्तरावरील कार्यालयांकडूनही सुनावणी घेण्यात येणार आहे.

या भूमि अदालतीद्वारे जिल्ह्यातील प्रलंबित अपिल प्रकरणांवर सुसंवादाच्या माध्यमातून न्याय व जलद निर्णय घेण्यावर भर दिला जाणार आहे. संबंधित नागरिकांनी किंवा अपीलकर्त्यांनी आपली सर्व आवश्यक कागदपत्रे व पुरावे सोबत घेऊन या तारखांना उपस्थित राहावे, जेणेकरुन प्रकरणांचा योग्य व अंतिम निपटारा करता येईल. भूमि अदालतेद्वारे तातडीने व पारदर्शक पध्दतीने प्रकरण सोडविण्याचा हेतू असून, त्यामुळे वेळेची व संसाधनांची बचत होणार आहे.

0000000

संबंधित पोस्ट

सामाजिक न्याय विभागाच्या योजना गाव-खेड्यातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचवा- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले• सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा..

श्रीमती अंजली शर्मा, भाप्रसे यांनी स्वीकारला जालना महानगरपालिका आयुक्तपदाचा पदभार

प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी स्व – संरक्षण प्रशिक्षणास विद्यार्थिंनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मुख्य प्रशिक्षक शिफूजी शौर्य भारद्वाज यांनी दिले दहा हजार विद्यार्थिंनींना आत्मनिर्भतेचे प्रशिक्षण

vishwatmaklokswamivarta

मावळातील प्रमुख पर्यटनस्थळांवर बंदी आदेश लागू; ३१ ऑगस्टपर्यंत कलम १६३ लागू पर्यटकांनी सुरक्षिततेसाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन

मध्यप्रदेश येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरीयल सोसायटी महूच्या वतीने जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील प्राध्यापक डॉ.जलबा नरवडे यांना मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांच्या हस्ते भीम रत्न पुरस्कार…

जालना पाटबंधारे विभागाचा कडक इशारा-पाणीपट्टी न भरल्यास पाणी व वीज पुरवठा खंडित करणार