vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सकलेचा नगरवासीयांची नागरी समस्यांपासून होणार मुक्तता, भास्कर आबा दानवे यांच्या पुढाकाराने कामांना सुरुवात…

सकलेचा नगरवासीयांची नागरी समस्यांपासून होणार मुक्तता, भास्कर आबा दानवे यांच्या पुढाकाराने कामांना सुरुवात…

जालना (प्रतिनिधी): शहरातील सकलेचा नगर भागात उघडी गटारे, रस्त्यावर तुंबलेले पाणी, बंद पथदिवे अशा नागरिक समस्यांनी येथील रहिवाशांचे जगणे मुश्किल केले होते. महानगरपालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कुठलीच दखल घेतली जात नसल्याने अखेर भारतीय जनता पार्टीचे महानगर जिल्हाध्यक्ष भास्करराव पाटील दानवे यांच्याकडे रहिवाशांनी कैफियत मांडली असता त्यांनी तातडीने यंत्रणा हालवून शनिवारी ( ता.29) प्रत्यक्ष कामास सुरुवात केली.

संकलेचा नगर भागात गुत्तेदाराने नालीचे बांधकाम अर्धवट सोडून भुयारी गटाची जोडणी व्यवस्थित केली नव्हती.गटारावर ढापे न टाकता उघडे ठेवून पेवर ब्लॉक सुद्धा बसवले नाही ,परिणामी परिसरात रस्त्यावर तुंबलेल्या गटारीच्या पाण्यातून रहिवाशी, शालेय विद्यार्थ्यांना ये-जा करावी लागत होती. बंद पथदिव्यांमुळे चोऱ्यांचे प्रमाणही वाढले होते. वर्षभरापासून मनपा प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याने येथील रहिवाशी मेटा कुटीस आले. दोन दिवसापूर्वी भास्करराव पाटील दानवे यांनी या भागात भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.आज सकाळी यंत्रणेसह प्रत्यक्ष कामास सुरुवात केली. त्याबद्दल रहिवाशांनी रमेशचंद्र अग्रवाल ( फरशीवाले ) यांच्या निवासस्थानी भास्करराव पाटील दानवे यांचा सत्कार केला.

यावेळी माजी नगरसेवक जीवन सले, सुनील राठी, धनराज काबलीये, रमेशचंद्र अग्रवाल ( फरशीवाले ) ,प्रवीण मोहता ,शांतीलाल सकलेचा ,अरुण अग्रवाल, द्वारकादास चेचानी ,कैलासचंद आगीवाल, पंकज गौड ,सौरभ सकलेचा ,नितीन अग्रवाल ,आदेश कोटेचा ,प्रकाश आगीवाल, रामेश्वर मंत्री ,रोहित नलावडे ,चोरमारे यांच्यासह परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.

0000

संबंधित पोस्ट

शेतकरी, महिला, युवा आणि सर्वसामान्य नागरिक ‘यवतमाळ महोत्सवा’चा केंद्रबिंदू – पालकमंत्री ना. संजय राठोड ‘यवतमाळ महोत्सवा’चे थाटात उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

पत्रकार दिनः जिल्हा माहिती कार्यालयात बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादनचौथा स्तंभ म्हणून माध्यमांचे योगदान अमूल्य- प्रशांत दैठणकर

पुणे जिल्ह्यातील तळेगाव ते चाकण 4 पदरी उन्नत महामार्गास मान्यता-राज्यातील सुलभ दळणवळणासाठी महामार्गाचे जाळे विकसित करण्याचे निर्देश- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• पायाभूत सुविधा समिती बैठक संपन्न

एक महिन्यात मराठी शिकण्याची संधी, अन्यथा बॅज तीन महिन्यांसाठी निलंबित – मंत्री प्रताप सरनाईक व्यावहारिक मराठी येत नसलेल्या १ हजार २६८ चालकांना नोटीस ३० सप्टेंबरपर्यंत राज्यभर तपासणी मोहीम

उद्योगांसाठी कर्ज योजनेचे अर्ज तातडीने निकाली काढावेत- जिल्हाधिकारी आशिष येरेकर

vishwatmaklokswamivarta

अमृत’ संस्थेची प्रशिक्षण, अर्थसहाय्य योजना; जिल्ह्यातील युवकयुवतींनी योजनांचा लाभ घ्यावा– विशेष कार्य अधिकारी सिद्धेश्वर वरणगावकर यांचे आवाहन, स्पर्धा परीक्षार्थींना मिळते अर्थसहाय्य..