vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

सातारा जिल्ह्यात रोजगाराची संधी: मेळाव्यांतून ७७६ तरुणांना दिलासा;मुख्यमंत्री युवा कार्य’ योजनेचाही मोठा टप्पा

सातारा जिल्ह्यात रोजगाराची संधी: मेळाव्यांतून ७७६ तरुणांना दिलासा;मुख्यमंत्री युवा कार्य’ योजनेचाही मोठा टप्पा

सातारा प्रतिनिधी : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना हक्काचा रोजगार मिळवून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्रामार्फत राबविण्यात आलेल्या उपक्रमांना मोठे यश मिळाले आहे. गेल्या वर्षभरात आयोजित ११ रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून ६६९ उमेदवारांची प्राथमिक, तर १०७ उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली आहे.

 पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा उपक्रमांतर्गत एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत जिल्हयातील विविध तालुक्यांमध्ये एकूण ११ मेळावे घेण्यात आले. या माध्यमातून १० वी, १२ वी, पदवीधर, आयटीआय (सर्व ट्रेड), डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग झालेल्या कुशल व अर्धकुशल तरुणांना नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली.

ख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा गाजावाजाशासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण’ योजनेने सातारा जिल्ह्यातील तरुणांना मोठा आधार दिला आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 3 हजार 736 तरुणांची निवड करण्यात आली असून, त्यांना विविध क्षेत्रांत प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे.१२ वी उत्तीर्ण: ६,००० रुपये, आयटीआय / पदविका (Diploma): ८,००० रुपये तर पदवीधर १०,००० रुपये योजनेअंतर्गत मिळणारे विद्यावेतन मिळणार आहे.

“तरुणांनी रोजगाराच्या या संधींचा लाभ घेण्यासाठी https://rojgar.mahaswayam.gov.in व www.cmykpy.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी या योजनांचा फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कसहभागासाठी काय करावे?ज्या उमेदवारांना आगामी रोजगार मेळाव्यांमध्ये सहभागी व्हायचे आहे किंवा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी खालीलप्रमाणे कार्यवाही करावी:ऑनलाईन नोंदणी: https://rojgar.mahaswayam.gov.in व www.cmykpy.mahaswayam.gov.inया संकेतस्थळावर आपली माहिती नोंदवावी. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालयाच्या ०२१६२-२३९९३८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

00000

संबंधित पोस्ट

रब्बी हंगाम 2025-26 प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन1 ते 7 डिसेंबर – 10 वा “पीक विमा सप्ताह”गहू, हरभरा व रब्बी कांदा पिकांसाठी 15 डिसेंबर 2025 पर्यंत नोंदणी

vishwatmaklokswamivarta

जनतेच्या सहकार्याने अमली पदार्थ मुक्त कामठी करणार – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्र्यांच्या नेतृत्वात ‘अमलीपदार्थ विरोधी रॅली’

रणरागिणी छत्रपती ताराराणी यांच्या समाधीस्थळी जागतिक दर्जाचे स्मारक उभारणार-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

केंद्र सरकार संपूर्ण अरवली पर्वतरांगेचे रक्षण करेल; खाण भाडेपट्टीने दिली जाणार नाहीत; संरक्षित क्षेत्राचा विस्तार केला जाणार

vishwatmaklokswamivarta

साताऱ्यात उत्साहात पार पडली ‘समता दिंडी; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन*

मिरवणुक मार्गावरील खड्डे बुजवा – शहरप्रमुख दुर्गेश काठोठीवाले

vishwatmaklokswamivarta