vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

धनादेश अनादर प्रकरणांसाठी १८ जुलै रोजी विशेष लोकअदालत

धनादेश अनादर प्रकरणांसाठी १८ जुलै रोजी विशेष लोकअदालत

 

अहिल्यानगर, प्रतिनिधी धनादेश अनादर (चेक बाऊन्स) आणि दाखलपूर्व प्रकरणांचा सामंजस्याने निपटारा करण्यासाठी जिल्ह्यात १८ जुलै २०२६ रोजी विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार असून संबंधित पक्षकार, बँका, वित्तीय संस्था तसेच विधिज्ञांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व या विशेष संधीचा लाभ घेऊन तडजोडीद्वारे वाद मिटवावेत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर यांनी केले आहे.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्री. एस. बी. कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकअदालतीमध्ये निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्टच्या कलम १३८ अंतर्गत न्यायालयात प्रलंबित असलेली धनादेश अनादराची प्रकरणे तसेच त्यासंदर्भातील दाखलपूर्व प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या प्रक्रियेमुळे संबंधित पक्षकारांचा वेळ, पैसा आणि श्रम यांची मोठ्या प्रमाणात बचत होईल.

प्रलंबित प्रकरणे लोकअदालतीत ठेवण्यासाठी संबंधित पक्षकारांनी आपले प्रकरण ज्या न्यायालयात सुरू आहे तेथे अर्ज सादर करावेत. तसेच दाखलपूर्व प्रकरणांसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा संबंधित तालुका विधी सेवा समितीकडे अर्ज करावेत, असेही कळविण्यात आले आहे.#विशेषलोकअदालत #LokAdalat2026 #अहिल्यानगर #Ahilyanagar

0000

संबंधित पोस्ट

162 व्या स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने धारावी विभागात या जनता पार्टी धारावी विभागातील 90 फूट रोड कामराज शाळेसमोर मोफत वह्या वाटप आणि परीक्षा पॅड वाटप…

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद व पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणुक; अंतिम प्रभाग रचना जाहीर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या उर्वरित याद्या लवकरच जाहीर होणार – मंत्री बाबासाहेब पाटील पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

मुंबई उपनगरात अतिक्रमण निष्कासन मोहिमेत १४ एकर जमीन मोकळी

आजची मोठी बातमी -पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल लागला सर्व आरोपींची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता. 20 वर्षांनी लागला निकाल…

vishwatmaklokswamivarta

माझी वसुंधरा अभियान 5.0′ मध्ये 10 लक्ष लोकसंख्येपेक्षा मोठ्या शहरांच्या अमृत गटात नवी मुंबई राज्यात व्दितीय**’माझी वसुंधरा अभियान ‘4.0’ आणि ‘5.0′ मध्ये व्दितीय क्रमांकाचे 2 पुरस्कार प्रदान**‘माझी वसुंधरा अभियान 4.0’ मध्ये ‘भूमी’ थीमॅटिक स्पेशल कॅटेगरीत सर्वोत्तम कामगिरी पुरस्कार*