vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

खासदार डॉ. कल्याण काळे यांनी काढला चिखलातून मार्ग आणि साधला शेतकर्‍यांशी संवाद; अतिवृष्टीग्रस्त भागाची केली पाहणी..

खासदार डॉ. कल्याण काळे यांनी काढला चिखलातून मार्ग आणि साधला शेतकर्‍यांशी संवाद; अतिवृष्टीग्रस्त भागाची केली पाहणी..

राज्य प्रतिनिधी-जालना जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. या पार्श्वभूमीवर जालना लोकसभेचे खासदार डॉ. कल्याण काळे यांनी बुधवार दि. 24 सप्टेंबर 2025 रोजी सकाळ पासून बदनापूर व अंबड आणि जालना तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकर्‍यांच्या बांधावर जाण्यासाठी खा. डॉ. कल्याण काळे यांना चिखल तुडवित मार्ग काढावा लागला. अखेर शेतकर्‍यांच्या नुकसानग्रस्त शेतीमध्ये जावून काळे यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधला.

बदनापूर तालुक्यातील तळणी, वाकूळणी तसेच अंबड तालुक्यातील मठ जळगाव, बनटाकळी आणि जालना तालुक्यातील गोलापांगरी यासह विविध गावातील शेतात आणि परिसरात जावून त्यांनी प्रत्यक्ष शेतकर्‍यांची व्यथा जाणून घेतली. पिकांचे मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान पाहता तात्काळ पंचनामा करून शेतकर्‍यांना त्वरित मदत मिळावी, अशा सूचना महसूल विभागाला डॉ. काळे यांनी दिल्या.

या पाहणीवेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, राजेंद्न राख,बदनापूर तालुका अध्यक्ष लक्ष्मण म्हसलेकर, जयप्रकाश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे राम सिरसाठ, भानुदास घुगे, कल्याण तारडे, दिनेश काकडे, बप्पासाहेब डोखळे, हनुमान धांडे, रामेश्वर फंड, जयसिंग राजपुत, सुभाष काटकर, विनायक आबा कोळकर, सुदाम काळे, तुकाराम संत, बंडु पागिरे,कृष्णा पाटील पडुळ, सोपान तिरूखे, माऊली इंगोले तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तीव्रता लक्षात घेता शेतकर्‍यांना त्वरित आर्थिक मदत व दिलासा मिळणे आवश्यक असल्याचे डॉ. काळे यांनी स्पष्ट केले

संबंधित पोस्ट

मोताळा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील महिला प्रशिक्षणार्थीना टूलकिट वाटप

बातमीचा राग- राग करून पोलिसांत खोटी तक्रार करणाऱ्या प्रियंका राजपूतची हकालपट्टी करा; पत्रकारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी-अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याचा ईशारा पत्रकारांचा जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक,महापालिका आयुक्तांना ईशारा

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचीथकीत कर्ज प्रकरणासाठी सवलत योजना..

vishwatmaklokswamivarta

मुसळधार पावसामुळे शेतकरी व नागरिक हतबल,भास्कर आबा दानवे यांनी तातडीने मदतीसाठी मागणी केली

vishwatmaklokswamivarta

रिमोट ऑपरेटिंग बोया ठरला देवदूत; काशीद समुद्रकिनारी बुडणाऱ्या दोन पर्यटकांना जीवदान*

vishwatmaklokswamivarta

बारामती विधानसभा पोटनिवडणुकरिता २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार आहे. मतदारांना आपला मतदानाचा हक्क निर्भय व सुलभरीत्या बजावता यावा, यासाठी मतदारांना भरपगारी सुट्टी जाहीर