बिहार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी ७ वाजता भाजप मुख्यालयातून देशवासीयांना संबोधित करणार आहेत.
राज्य प्रतिनिधी- बिहार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर पंतप्रधान @narendramodi आज सायंकाळी ७ वाजता भाजप मुख्यालयातून देशवासीयांना संबोधित करणार आहेत.
सुशासनाचा विजय झाला आहे. विकासाचा विजय झाला आहे. जनकल्याणाच्या भावनेचा विजय झाला आहे. सामाजिक न्यायाचा विजय झाला आहे. 2025 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये एनडीएला ऐतिहासिक आणि अभूतपूर्व विजय देऊन आशीर्वाद देणाऱ्या बिहारच्या जनतेचे मनःपूर्वक आभार. हा प्रचंड जनादेश आम्हाला जनसेवेसाठी अधिक सक्षम करतो आणि बिहारसाठी नव्या निर्धाराने काम करण्याची ऊर्जा देतो, असे पंतप्रधान @narendramodi यांनी ट्वीट केले आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आगामी काळात बिहारच्या विकासासाठी, येथील पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी आणि राज्याच्या समृद्ध संस्कृतीला नवी ओळख देण्यासाठी आम्ही अधिक जोमाने काम करणार आहोत.
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला मिळालेल्या अभूतपूर्व विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले. ते म्हणाले, कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमांमुळे आमचा विकासवादी अजेंडा जनतेपर्यंत पोहोचला आणि विरोधकांच्या प्रत्येक खोट्या दाव्याला ठामपणे उत्तर देण्यात यश आलं.
2025च्या विधानसभा निवडणुकांमध्ये एनडीएला दिलेल्या ऐतिहासिक आणि अभूतपूर्व विजयाच्या आशीर्वादाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहे ते म्हणाले, हा सुशासनाचा विजय आहे, विकासाचा विजय आहे, जनकल्याणाच्या भावनेचा विजय आहे, सामाजिक न्यायाचा विजय आहे. हा प्रचंड जनादेश आम्हाला जनतेची सेवा करण्याची आणि बिहारसाठी नवे संकल्प पूर्ण करण्यासाठी नवी ऊर्जा देणारा आहे.एनडीएनं राज्याचा सर्वांगीण विकास घडवून आणला आहे. आमचा ट्रॅक रेकॉर्ड आणि बिहारला नवीन उंचीवर नेण्याच्या आमच्या दृष्टिकोनावर विश्वास ठेवत जनतेनं आम्हाला अभूतपूर्व बहुमत दिलं असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले त्याचबरोबर त्यांनी या प्रचंड विजयाबद्दल मुख्यमंत्री नीतीश कुमार, तसेच सहकारी चिराग पासवान, जीतन राम मांझी आणि उपेंद्र कुशवाहा यांचे अभिनंदन केले