भाजपा जालना महानगर जिल्ह्याच्या वतीने बिहार विधानसभेच्या विजयाचा जल्लोष…
जालना (प्रतिनिधी) : आज दि.१४ नोव्हेबर रोजी बिहार विधानसभेची मतमोजणी सकाळी ८.०० वाजता सरू झाली दुपारी २.०० वाजेपर्यंत एनडीए चे उमेदवार २०० जागांवर आघाडी घेऊन खूप मोठ्या फरकाने विजयाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याने भारतीय जनता पार्टी, जालना महानगर जिल्ह्याच्या वतीने भाजपा जिल्हा कार्यालयासमोर जालना महानगर जिल्हा भाजपा नेते माजी आमदार कैलासजी गोरंटयाल यांच्या नेतृत्वाखाली व भाजपा माजी जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश निमंत्रित सदस्य रामेश्वर पाटील भांदरगे, प्रदेश निमंत्रित सदस्य विजय कामड, माजी जिल्हाध्यक्ष पांगारकर, युवानेते अक्षय गोरंटयाल यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये मिठाई वाटून, फटाके फोडून ढोल ताशांच्या गजरात जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी बोलताना कैलास गोरंटयाल म्हणाले की, हा विजय एनडीए च्या सरकारने बिहार मध्ये देशाचे कणखर नेते नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात जो विकास केला व बिहार मधील जंगल राज संपवून विकास सुशासन त्या ठिकाणी दिले त्याचीच पावती म्हणून बिहार मधील जनतेने पुन्हा एकदा मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन एनडीए सरकारला मोठे बहुमत दिले. या निवडणुकी मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मोठ्या प्रमाणावर प्रचार केला असून बिहारी जनतेला विकासाबाबत आश्वासित केले तसेच बिहार निवडणूक प्रभारी विनोद तावडे यांनी बिहार मध्ये एनडीएच्या सर्व घटक पक्षाला विश्वासात घेऊन अतिशय व्यवस्थित असे नियोजन करून या निवडणुकीचा निकाल एनडीएच्या बाजूने आणण्यासाठी अथक परिश्रम घेऊन घटक पक्षाशी समन्वय ठेऊन मोठा विजय मिळवून दिला.