vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र सादर करणे बंधनकारक

मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र सादर करणे बंधनकारक

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी

ज्या आस्थापनांवर २५ किंवा त्यापेक्षा अधिक लोक काम करतात अशा सर्व आस्थापनांनी ३१ जानेवारी २०२६ पर्यंत आपल्याकडील मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरण पत्र ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे, असे सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांनी कळविले आहे.

 या आस्थापनांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र व राज्य शासन यांची सर्व कार्यालये, अंगिकृत उद्योग/ व्यवसाय/ महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद / पंचायत समिती, महानगर पालिका, नगरपालिका, तसेच खाजगी क्षेत्रातील २५ किंवा अधिक लोक काम करतात अशा सर्व आस्थापना, उद्योग, व्यापार , व्यवसाय, कारखाने यांचा समावेश होतो. अशा आस्थापनांना सेवायोजन कार्यालये (रिक्तपदाची सुचना देणे सक्तीचे) कायदा १९५९ व त्या अंतर्गत नियमावली १९६० नुसार त्रैमासिक विवरणरपत्र नमुना ई-आर १ तिमाही संपल्यानंतर म्हणजेच डिसेंबर – २०२५ अखेर ३० दिवसांच्या आत सादर करणे बंधनकारक आहे. या प्रमाणे नियोक्त्यांच्या लॉग-इन मध्ये विवरणपत्र www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यानुसार विवरणपत्र दि. ३१ जानेवारी २०२६ पर्यंत सादर करावे.

विवरणपत्र ऑनलाईन कसे सादर कराल?

यासाठी www.rojgar.mahaswayam.gov.in वेबसाईट ओपन करुन एम्प्लॉयर (लीस्ट अ जॉब) वर क्लिक करुन एम्प्लॉयर लॉग इनमध्ये नियोक्त्यांचा युजर आय डी व पासवर्ड वापरुन लॉग इन करुन ई-आर रिपोर्ट मधील ई-आर १ या ऑप्शनवर क्लिक करुन ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे.

 यासाठी काही तांत्रिक अडचण आल्यास किंवा अधिकच्या सहाय्यासाठी सोमवार ते शुक्रवार रोजी सार्वजनिक सुट्या वगळून सकाळी १० ते सांयकाळी ६ वाजेपर्यत या कार्यालयाच्या (०२४०) २९५४८५९ दूरध्वनीवर संपर्क साधावा.

विवरणपत्र सादर न करणाऱ्या आस्थापनांवर कायदेशीर कारवाई होऊ शकेल, याची नोंद घ्यावी असे सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांनी कळविले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

बुलढाणा येथे पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

मराठी भाषा पंधरवडानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ‘पुस्तक प्रदर्शन, ‘विक्री’ आणि ‘ग्रंथदान’ उपक्रम; ग्रंथदान करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्हा-लातूर जिल्ह्यात रात्रभर संततधार पाऊस सुरू असून खालील मार्गावर पुलावर पाणी आल्याने सदर मार्गावरील एस. टी.बस वाहतूक बंद विविध ठिकाणी पावसामुळे बंद असल्याने नागरिकांच्या माहितीकरिता

सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे ⁠थ्री स्टार करणार,राज्यातील १२५ वसतिगृहांसाठी बाराशे कोटींची तरतूद   – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट- मिरजमधील दोन वसतिगृहांच्या नूतन इमारतींचे लोकार्पण

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

दिल्लीचे उद्योग, अन्न व नागरी पुरवठा, वने मंत्री सरदार मनजींदर सिघ सिरसा यांचे नांदेड विमानतळ येथे आगमन व स्वागत  

vishwatmaklokswamivarta