आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त नवी दिल्ली येथील पक्ष कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.
नवी दिल्ली प्रतिनिधी-आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त नवी दिल्ली येथील पक्ष कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.आजचा हा वर्धापन दिन अत्यंत वेगळा आणि भावनिक आहे, कारण आज आपल्या सर्वांमध्ये आपले आदरणीय दादा नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीत हा दिवस साजरा करताना त्यांच्या आठवणी मनात दाटून येतात.
आदरणीय दादांनी पक्षासाठी जे कार्य केलं, जे योगदान दिलं आणि जी निष्ठा दाखवली, ते कधीही विसरता येणार नाही. शिव-शाहू-फुले-आंबेडकर या विचारधारेचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले, ते खरंच प्रेरणादायी आहेत.
त्यांचे विचार, त्यांचा मार्ग आणि त्यांचे कार्य पुढे नेण्याचा आम्हा सर्वांचा ठाम संकल्प आहे. आजपर्यंत साथ दिलेल्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानते. असल्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या प्रमुख सुनेत्राताई अजित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट एक्स वर असे म्हणाले