vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व डिझेल इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षण कार्यक्रम प्रवेशासाठी युवकांनी अर्ज करावेत

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व डिझेल इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षण कार्यक्रम प्रवेशासाठी युवकांनी अर्ज करावेत

 रायगड-अलिबाग प्रतिनिधी,: सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व डिझेल इंजिन देखभाल व परिचालन या मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, रायगड-अलिबाग येथे दिनांक 1 जुलै 2026 पासून प्रशिक्षणाच्या सुरु होणाऱ्या प्रशिक्षण सत्रासाठी रायगड जिल्ह्यातील युवकांनी दि.30 जून 2026 पर्यंत अर्ज सादर करावेत,असे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी महेश खरात यांनी केले आहे.

मत्स्यव्यवसाय विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या सहा महिने मुदतीचे प्रशिक्षणांतर्गत प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रात्यक्षिक व सिध्दांतिक ज्ञान दिले जाते.  त्याबाबतचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे :-प्रशिक्षण कालावधी- 01 जुलै 2026 ते 31 डिसेंबर 2026 (6 महिने) आहे.

आवश्यक पात्रता पुढीलप्रमाणे आहे. उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्ष असावे. आधारकार्ड व रेशनकार्ड छायाप्रत जोडणे. उमेदवार किमान चौथी पास असणे आवश्यक, शाळा सोडल्याच्या दाखल्याची छायाकिंत प्रत जोडणे आवश्यक, क्रियाशील मच्छिमार व किमान एक वर्ष मासेमारीचा अनुभव असावा. तसेच विहित नमुन्यातील अर्जावर मच्छिमार सहकारी संस्थेची शिफारस घ्यावी. उमेदवारास पोहता येणे आवश्यक आहे.

प्रशिक्षण शुल्क :- i) प्रतिमाह रु. 450/- प्रमाणे सहा महिन्यांचे रु. 2700/- मात्र. ii) दारिद्रय रेषेखालील असल्यास प्रतिमाह रु.100/- प्रमाणे सहा महिन्यांचे रु. 600/- मात्र. (दारिद्रय रेषेखालील उत्पन्नाचा गटविकास अधिकारी यांचा दाखला जोडावा.)

प्रशिक्षणामुळे रोजगार स्वयंरोजगाराच्या संधी असून i) राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) अंतर्गत योजनेतून अर्थ सहाय्य घेवून मच्छिमारी नौका बांधता येते. ii) सरकारी किवा खाजगी विभागांच्या सागरी नौकांवर पात्रतेनुसार खलाशी म्हणून रोजगाराची संधी उपलब्ध होवू शकते. संपर्कासाठी पत्ता:- महेश किसन खरात, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी मो.क्र.7758969112 किंवा श्री. धीरज शहुराव भोयर, मोबाईल व Whas app क्र. – 9860254943, यांत्रिक निदेशक, रायगड-अलिबाग, मत्स्यसंकुल इमारत, अलिबाग कोळीवाडा, कस्टम कार्यालयाच्या बाजूला,अलिबाग, ता.अलिबाग, जि.रायगड. पिन-402201 ईमेल : ftoalibag@rediffmail.com

तरी इच्छुक युवकांनी या प्रशिक्षण केंद्राशी किंवा मोबाईल व Whas app मो.क्र.7758969112 व क्र. 9860254943 सपंर्क साधल्यास विहीत नमुन्यातील अर्ज उपलब्ध करुन देण्यात येइल. अर्ज स्वत:चे हस्ताक्षरात भरुन त्यावर संस्थेची शिफारस घेऊन दिनांक 30 जून 2026 पर्यंत कार्यालयीन वेळेत कामकाजाचे दिवशी वर नमुद Whas app किवा ईमेल सादर करावेत.

00000

संबंधित पोस्ट

पोलिस आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर शहर ..शहरातील फळ विक्रेता आणि रमजान ईद संबंधी व्यापाऱ्यांना वाढवित वेळ देण्याबाबत निवेदन

मिशन वात्सल्य अंतर्गत जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा*

शिवराज्याभिषेक सोहळ्याचे काटेकोरपणे नियोजन करा — रोहयो मंत्री भरत गोगावले #शिवराज्याभिषेक रायगड जिमाका दि. १६– रायगड किल्ला येथे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे तिथी व तारखेनुसार अनुक्रमे ६ व ९ जून रोजी आयोजन करण्यात आले आहॆ. या कार्यक्रमाच्या नियोजनाची रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्या अध्यक्षते खाली सर्व प्रमुख विभागांची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी या कार्यक्रमाचे काटेकोर नियोजन करण्याच्या सुचना त्यांनी सर्व यंत्रणेला दिल्या. महाड शासकीय विश्रामगृहात आयोजित या बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अप्पर पोलीस अधिक्षक अभिजित शिवथरे, उपजिल्हाधिकारी डॉ रविंद्र शेळके यांसह विविध विभागाचे अधिकारी व कोकणकडा मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले की ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा आपल्या अस्मितेचा विषय आहॆ. गेली ३५ वर्ष हा उत्सव सुरु आहॆ. या कार्यक्रमाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहॆ. त्यामुळे हा कार्यक्रम सुनियोजित व सुव्यवस्थितपणे पार पडण्याची जबाबदारी सर्वांवरच आहे. तेव्हा प्रत्येकाने आपले काम चोखपणे करावे. शिवभक्तांना सर्व सोयी सवलती विहित मुदतीत उपलब्ध करून द्याव्यात त्यामध्ये कुठलेही हयगय करू नये असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यंदा मान्सून लवकर सुरु झाला आहॆ. त्यामुळे पावसाची शक्यता लक्षात घेऊन मंडप, भोजन, विद्युत आणि आरोग्य व्यवस्था तैनात ठेवाव्यात. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास वैद्यकीय पथक सुसज्ज ठेवावे, गडावर पुरेश्या प्रमाणात वैद्यकीय पथक, स्ट्रेचर, औषधसाठा ठेवावा. विशेषता सर्पदंश होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याप्रमाणे औषधे उपलब्ध ठेवावीत. जिल्हा प्रशासनाने कार्यक्रम नियोजनासाठी गठीत केलेल्या समित्यानी आपली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी असेही श्री गोगावले यांनी सांगितले. जिल्हाधिकारी श्री जावळे म्हणाले की,शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने वेगवेगळ्या समित्याची नेमणूक केली आहे. मुख्यत्वे आरोग्य,पाणी पुरवठा,मंडप,खानपान, राजशिष्टाचार,परिवहन, विद्युत, पाणी आणि शौचालय आदी सर्व समित्यांची नेमणूक केली आहॆ. सर्व नियोजन सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. या बैठकीत सर्व समित्यानी केलेल्या कामाचा आढावा सादर केला. तसेच कोकण कडा मित्र मंडळाने देखील आवश्यक बाबीबाबत सूचना केल्या.

वार्षिक उदयोग पाहणी सर्वेक्षण 31 जुलैपर्यंत होणार

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या संयुक्त शेतीधारक शेतकऱ्यांनावीज पुरवठ्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार  – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

जिल्हाधिकारी मुलचेरात शेतीच्या बांधावर : नुकसानग्रस्त शेतीची पाहणी व निवासी पट्टे वितरण

vishwatmaklokswamivarta