vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

शिवजयंतीनिमित्त आज ‘जय शिवाजी-जय भारत’ पदयात्रा

शिवजयंतीनिमित्त आज ‘जय शिवाजी-जय भारत’ पदयात्रा

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त सर्व जिल्ह्यांमध्ये ‘जय शिवाजी- जय भारत’ या पदयात्रेचे आयोजन करण्याचे निर्देश केंद्र शासनाने दिले आहेत. यानिमित्त शहरात  सकाळी साडेसात वा. या पदयात्रेचा आरंभ, क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुषहार अर्पण करुन या पदयात्रेस सुरुवात झाली.त्यानंतर पैठण गेट, गुलमंडी मार्गे या पदयात्रेचा समारोप औरंगपुरा येथील महात्मा फुले पुतळ्याजवळ होईल.

 या कार्यक्रमास सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागास बहुजन कल्याण तथा दुग्धविकास व अपारंपारिक उर्जा मंत्री अतुल सावे,राज्यसभा सदस्य खा. डॉ. भागवत कराड, लोकसभा सदस्य खा. संदिपान भुमरे, विधान परिषद सदस्य आ. विक्रम काळे, आ. सतिष चव्हाण, विधानसभा सदस्य प्रदीप जयस्वाल, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, मनपा आयुक्त जी.श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना उपस्थित होते

 या पदयात्रेत क्रीडा ज्योत विद्यार्थी नेली. ही ज्योत यात्रेच्या समारोपानंतर विभागीय क्रीडा संकुलात नेण्यात येईल. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी शिवकालिन वेशभुषेत व शिवचरित्रातील व्यक्तिरेखांच्या वेशभुषांमध्ये किंवा शालेय गणवेशात सहभागी होतील. क्रांती चौक येथे तलवारबाजी, सायकलींग, स्केटिंग, मल्लखांब, जिमनॅस्टिक, योगासन, पोवाडा, पाळणागीत इ. सादरीकरण होणार आहे. या पदयात्रेत नेहरु युवा केंद्र, राष्ट्रीय छात्रसेना, तसेच शहरातील शाळा महाविद्यालये सहभागी होणार आहेत. सहभागाचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांनी केले आहे.०००००

संबंधित पोस्ट

स्त्री ही नैसर्गिक शक्तिमान असती तिच्या पाठीवर कौतुकाची थाप पडल्यास तिला अधिक लढण्याची बळ मिळते –संजीवनी ताडेगावकरआधार ग्रुपने केला विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान महिलांचा गौरव

vishwatmaklokswamivarta

समाजकारणाच्या मजबुतीसाठी राजकारण महत्त्वाचे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा मित्र परिवारातर्फे भावपूर्ण सत्कार,वेगळ्या विदर्भाला पाठिंबा असल्याचे केंद्रीयराज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचे मत*  

जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये दाव्याविना 176 कोटी रुपये पडून दावा न केलेल्या ठेवी परत मिळवण्यासाठीची मोहीम..

vishwatmaklokswamivarta

आज 🌧️ रायगड जिल्ह्यातील ७ तालुक्यांतील शाळांना 2 जुलै  सुट्टी जाहीर केली

पत्रकार दिनः जिल्हा माहिती कार्यालयात बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादनचौथा स्तंभ म्हणून माध्यमांचे योगदान अमूल्य- प्रशांत दैठणकर

चिखलीत निषेधाचा बुलंद आवाज! काँग्रेस प्रदेशाध्यक्षाच्या अश्लाघ्य व बेताल वक्तव्याविरुद्ध तीव्र संताप: